रसिकतेचं आणि वेदनेचं नातं बरंच जवळचं आहे. जर वेदना नसेल तर जगणं फारच गुळचट/ स्वप्नाळू होउन जाईल. त्यामुळे केवळ आनंदासाठी कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं माझ्य़ा रसिकतेच्या भूमिकेत बसत नाही. त्यामुळे एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट गंभीर आहे किंवा शोकांत आहे म्हणून न बघणं मला पटत नाही. कलेची परिपूर्ण व्याख्य़ा करण्याएवढा अजून विचार झालेला नाही पण जी मला जगण्याच्या जास्त जवळ घेउन जाते, जो प्रत्येक अनुभव मला घेणं शक्य नाही तो अनुभव एका रुपात माझ्यापुढे मांडते ती कला असं मला वाटतं. यात रंजनाचा भाग आहे पण केवळ रंजन नाही.
मागे एकदा अभय बंग यांनी एका भाषणात फार सुंदर मुद्दा मांडला होता. आपण गरीबांच्या/पीडीतांच्या/वंचिताच्या/ निसर्गाच्या दु:खाशी का जोडून घ्यावं याचं उत्तर देताना ते म्हणाले की बाबा आमटे यांच्या आनंदवनात कुष्ठरोग झालेला एक मुलगा होता जो वेदनेसाठी देवाकडे प्रार्थना करायचा. जर वेदना झाली तर हातपाय जिवंत आहेत जर वेदना झाली नाही तर कुष्ठरोग आपलं जाळं पसरवतोय आणि आपण मृत्यूच्या जास्त जवळ जातोय. त्याचप्रमाणे समाजातील गरीबांच्या किंवा पीडीतांच्या दु:खाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच कोषात राहिलो तर आपल्याला मनाचा कुष्ठरोग व्हायला वेळ लागणार नाही. मग उरेल एक संवेदनाहीन मन जे कुठल्याच भावनांना अनुभवू शकणार नाही.
मला हा वेदनेचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे पटला. मी माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रीण आठवून पाहिले आणि मला जाणवलं की ज्या- ज्यावेळेस आमच्या दोघापैकी कुणीतरी एकजण दु:खात होतं त्यावेळेस त्याला/तिला दुसऱ्याने आधार दिला किंवा दु:ख समजावून घेतलं. त्या दु:खाच्या bond मुळेच मैत्री जास्त घट्ट होऊ शकली. केवळ मौजमजेवर आधारीत मैत्री फार जवळीक साधू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत दोन-तीन-चार वर्ष घालवलीत, फक्त मौजमजा केली ते मित्र/मैत्रिणी तेवढी वर्षं संपली की लगेच किंवा काही काळानंतर माझ्या भावविश्वातून दूर होत गेले.
काही दिवसांपुर्वी निर्माण शिबिरात एका सत्राची सुरूवात प्रियदर्शनने लताच्या ’दर्द से मेरा दामन भर दे’ या गाण्याने केली. त्यावेळेस हे गाणं आणि त्याचे शब्द खूपच आवडले. माझा हा लेख या गाण्यापासूनच सुचला. ’दर्द से मेरा दामन’ इथे ऐकता येईल. त्याचे शब्द इथे हिंग्लीश मधे आणि इथे हिंदी मध्ये वाचता येतील.
मागे एकदा अभय बंग यांनी एका भाषणात फार सुंदर मुद्दा मांडला होता. आपण गरीबांच्या/पीडीतांच्या/वंचिताच्या/ निसर्गाच्या दु:खाशी का जोडून घ्यावं याचं उत्तर देताना ते म्हणाले की बाबा आमटे यांच्या आनंदवनात कुष्ठरोग झालेला एक मुलगा होता जो वेदनेसाठी देवाकडे प्रार्थना करायचा. जर वेदना झाली तर हातपाय जिवंत आहेत जर वेदना झाली नाही तर कुष्ठरोग आपलं जाळं पसरवतोय आणि आपण मृत्यूच्या जास्त जवळ जातोय. त्याचप्रमाणे समाजातील गरीबांच्या किंवा पीडीतांच्या दु:खाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच कोषात राहिलो तर आपल्याला मनाचा कुष्ठरोग व्हायला वेळ लागणार नाही. मग उरेल एक संवेदनाहीन मन जे कुठल्याच भावनांना अनुभवू शकणार नाही.
मला हा वेदनेचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे पटला. मी माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रीण आठवून पाहिले आणि मला जाणवलं की ज्या- ज्यावेळेस आमच्या दोघापैकी कुणीतरी एकजण दु:खात होतं त्यावेळेस त्याला/तिला दुसऱ्याने आधार दिला किंवा दु:ख समजावून घेतलं. त्या दु:खाच्या bond मुळेच मैत्री जास्त घट्ट होऊ शकली. केवळ मौजमजेवर आधारीत मैत्री फार जवळीक साधू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत दोन-तीन-चार वर्ष घालवलीत, फक्त मौजमजा केली ते मित्र/मैत्रिणी तेवढी वर्षं संपली की लगेच किंवा काही काळानंतर माझ्या भावविश्वातून दूर होत गेले.
काही दिवसांपुर्वी निर्माण शिबिरात एका सत्राची सुरूवात प्रियदर्शनने लताच्या ’दर्द से मेरा दामन भर दे’ या गाण्याने केली. त्यावेळेस हे गाणं आणि त्याचे शब्द खूपच आवडले. माझा हा लेख या गाण्यापासूनच सुचला. ’दर्द से मेरा दामन’ इथे ऐकता येईल. त्याचे शब्द इथे हिंग्लीश मधे आणि इथे हिंदी मध्ये वाचता येतील.