Friday, December 26, 2008

शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trends

बर्याच जणांना माझी ही post आवडणार नाही. कारण त्यामध्ये त्यांच्या शास्त्रीय संगीतातील जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना धक्का लागू शकतो.

परवाच (मराठी "परवा" - वर्षांपर्यंत मागे जाउ शकतो) पुण्यात शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्व महोत्सव झाला. पूर्ण नाही पण बराचसा ऐकला. अगदीच मोजके (२-३) performance माझ्या मनाला भिडले. अगदी गाजलेले म्हणावेत अशा संगीतकारांनीही निराशा केली (किंवा नेहमीच करतात). त्यातून आणि in-general गेल्या काही दिवसांत शास्त्रीय संगीत ऐकण्यात जे बदल मी अनुभवले ते मांडावेसे वाटतात. हे बदल आत्ताच झाले असतील असे नाही पण मला गेल्या २-३ वर्षात प्रकर्षाने जाणवले.

वाद्य किंवा कंठ (vocal) हे एक माध्यम आहे ज्यातून संगीतकार आपले संगीतविचार सांगत असतो. शास्त्रीय संगीताच्या साधनेत दोन गोष्टी आहेत - पहिली माध्यमावरची (किंवा ते वाजवण्याच्या तंत्रावरची) हुकुमत आणि दुसरी स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत जाणं. पहिली गोष्ट जी आहे ती तुलनेने फारशी अवघड नाही. म्हणजे काय, की काही ठराविक वर्षे तंत्राचा रियाज केला की तंत्रावर हुकुमत येऊ शकते. आता ही ठराविक वर्षे कुणासाठी /१०/१५/२०/२५/४० अशी असू शकतात. पण तंत्रावर हुकुमत मिळवणं हे बरंचसं hard work मधून साधु शकतं. पण दुसरी गोष्ट जी आहे - स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत राहणं त्यासाठी मात्र विचारप्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, एक उपजत सौंदर्यदृष्टी असावी लागते, प्रतिभा असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्णत्वाला पोचलेलो नाही आहोत हे भान कायम जागृत असावं लागतं.आता ही दुसरी गोष्ट फक्त hard work ने साधू शकते का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की अतिउच्च प्रतीचा संगीतकार असेल तर त्यात थोडासा नैसर्गिक देणगीचा भाग असायला लागतो.

एखादा चांगला संगीतकार होण्यासाठी तंत्रावरची हुकुमत तर आवश्यक आहेच पण पुरेशी नाही. कारण संगीतविचार प्रगल्भ नसतील तर नुसत्या तंत्राने संगीत प्रभावी होउ शकत नाही. एखादा राग कुठल्याकुठल्या काव्यरसाशी जोडला जातो, त्याचं स्वरुप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे - तो राग लाजरा आहे की धीट आहे, धसमुसळा आहे की नाजुक आहे,. त्याचा जीव किती (किंवा तो किती वेळ रंगवता येईल) या सगळ्या गोष्टींवर संगीतकाराला अतिशय मेहनत(विचार) करावी लागते. असाच विचार फक्त राग या गोष्टीवर नसून ताल/गायकी . अनेक गोष्टींवर एकत्रितपणे करावा लागतो. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा विचार तंत्राशिवाय केला जाऊ शकतो.

संगीतकार/ साथीदार करत असलेल्या काही चुका
. केवळ फास्ट वाजवणं म्हणजेच चांगल वाजवणं असं समजणं ही पहिली चूक. ते काही वेळ बरं वाटू शकतं पण काही वेळानंतर irritating होतं. यात आजकालचे बहुतेक वाद्य वाजवणारे येतात. अगदी ज्येष्ठ आणि (तथाकथित) लोकप्रिय संगीतकारपण (वाद्यवादक) असं समजतात याचं दु: होतं.
. साथीदार म्हणजे तबलजी/संवादिनी यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते साथ करत आहेत आणि स्वतःचं कौशल्य दाखवण्याची ही जागा नाही. ते कौशल्य त्यांनी सोलो वादनात दाखवावे. एखाद्या/दुसर्या ठिकाणी तबल्याच्या हरकती चांगल्या वाटू शकतात पण त्या जास्त झाल्यानंतर त्याला मूळ वादक तबलजी यातील हाणामारीचं स्वरूप येतं आणि मूळ रागाचा विचार अगदीच बाजूला पडतो. चांगल्या साथीदारांची उदाहरणं द्यायची झाली तर पुष्कळ आहेत. . अहमदजान थिरकवा साहेब, पं सुरेश तळवळकर, पं अरविंद थत्ते, पं अप्पा जळगावकर ही काही लगेच आठवणारी नावं. हे सर्व अतिशय मोठे कलाकार आहेत पण यांची साथ कुठेही आक्रस्ताळेपणा करता अतिशय संयत असते. यातले तबलेवाले आणि आजकालचे काही इतर leading आणि popular तबलजी आठवून बघा म्हणजे फरक जाणवेल. कधीकधी असंही जाणवतं की वादकाची तयारी कमी असल्यामुळे तो/ती तबलजीला जास्त scope देतात.
. काही वाद्य ही लोकसंगीतातून/ पाश्चात्य पद्धतीतून शास्त्रीय संगीतात आलेली आहेत याचं भान ठेवणं. दरबारी कानडा हा राग संतूरवर ऐकून मी सर्द झालो. हा राग मींडकारी/ आंदोलनातून खुलतो. संतूर या वाद्यावर दोन्ही गोष्टी प्रभावीपणे वाजवणं शक्य नाही, वाजवल्या तरी कानाला गोड वाटत नाही. आता माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला ज्या गोष्टी कळतात त्या एवढ्या मोठ्या कलाकाराला कळत नाहीत की कळूनही वळत नाहीत?
. लोकांना आवडेल तसं आपलं गाणं mold करणं. या मुद्द्या वर मुळातून वाद होउ शकतात. पण केवळ लोकांना आवडतं म्हणून एकच आलाप/तान पुन्हापुन्हा गाणं/वाजवणं यानं काय साध्य होतं?

५.एखाद्या व्यक्तीचे गुरू मोठे असतील तर त्या व्यक्ती पण मोठ्या असतील असे नाही. माझे गुरू उस्ताद अमुक किंवा पंडितजी तमुक असा सारखासारखा उल्लेख केल्याने आपण फार मोठे कलाकार होत नाही उलट जाणकारांत आपलं हसू होतं. त्यामुळे गुरूच्या नावाची पुण्याई फार दिवस टिकत नसते याची जाणीव गायक/वादकांनी ठेवावी व आपापल्या संगीतावर प्रामाणिक मेहनत करावी.


श्रोत्यांच्या काही त्रुटी :
. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायची वृत्ती - अर्थात हे सर्व श्रोत्यांना शक्य नाही पण कमीतकमी संगीताच्या विद्यार्थ्यांनी तरी याकडे गंभीरपणे बघायची गरज आहे. उदा. जो कोणी .रशिद खाँची स्तुती करतो त्याला मी रशिद खाँचे गुरु . निस्सार हुसेन खा साहेब ऐकण्याची शिफारस करतो. निस्सार हुसेन साहेबांची गायकी रशिद खां पेक्षा चांगली आहे त्यांचं गाणं ऐकल्यावर रशिद खाँच्या आजकालच्या गाण्यातील त्रुटी दिसतात. आजकालच्या इंटरनेटच्या युगात तर कुठलीही गोष्ट गुगलली की सापडते. इंटरनेटवर शोध घेतला तर निस्सार हुसेनखाँच्या काही recordings सापडतात, असे असताना फारच कमी जण मूळ आणि दर्जेदार गाण्याचा शोध घेताना दिसतात.

चांगल्या संगीत समीक्षकांची कमतरता :
. उठसूट कुठल्याही गाण्याला बहारदार/रंगतदार म्हटलं की त्या शब्दांना मोल रहात नाही. एखादं गाणं खराब झालं तर लिहा नं ते खराब झालं म्हणून. या वेळेस तर जवळपास सगळ्या newspapers मधे मला हे जाणवलं. मी एकदा अतिशय भिकारी गाण्याचं वर्णन बहारदार असं वाचलं आणि पुढचं परीक्षण वाचायचंच सोडून दिलं. अर्थात यात दोष रिपोर्ट लिहीणार्यांचा नसून तो newspapers चा आहे आणि कदाचित त्यांचाही नसेल कारण त्यांनाही त्यांना परवडणार्या rate मधे चांगलं समीक्षक मिळत नसेल.

या गोष्टींमुळे जो नवखा श्रोता असतो तो चुकीच्या गोष्टींना शास्त्रीय संगीत समजतो किंवा पळुन तरी जातो. change is the only constant thing असं म्हणतात. त्या न्यायाने सध्या जे शास्त्रीय संगीत आहे ते पण कुठल्यातरी बदलातून आलेलं आहे आणि ते यापुढेपण बदलत राहणार. फक्त बदल करणार्‍यांनी (किंवा आम्ही बदल करतो असं म्हणणार्‍यांनी) स्वतःच्या कुवतीचा अंदाज घ्यावा आणि मग बदल करावेत.

Wednesday, December 17, 2008

तुकाराम

सध्या तुकाराम वाचतोय. मी नास्तिकतेकडे वाटचाल करणारा माणूस आहे याचा मागे उल्लेख केलेला आहे. तरीही संतवाङ्मय हा माझ्या interest चा विषय आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं आणि धार्मिक (किंवा आस्तिक) असणं यांचा काहीही संबंध नाही हे बर्‍याच मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे आणि ते मी स्वतः पण अनुभवतो. त्यामुळे मी कुठलीही धार्मिक श्रद्धा न बाळगता संत साहित्य वाचतो व ते enjoy पण करू शकतो. संतांच्या उत्कट आणि आत्यंतिक प्रामाणिक भावना, त्यांची समाजसुधारणेची तळमळ, सरस काव्य या गोष्टींमुळे संतसाहित्याबद्दलची भीती (भाषेची आणि उपदेश ऐकण्याची) कमी झाली आणि ते साहित्य वाचायची आवड निर्माण झाली.

समग्र ग्रंथांमध्ये (स्फुट अभंग किंवा अभंगाचे निरूपण सोडून) याआधी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला होता पण ज्ञानेश्वरी झेपली नाही. आपली अजून ज्ञानेश्वरी वाचायची maturity आलेली नाही हे जाणवलं आणि ज्ञानेश्वरी काही काळासाठी बाजूला ठेवलीये. माझ्या एका ज्येष्ठ मित्राने मला तुकाराम वाच असं recommend केलं. म्हणून तुकाराम गाथा (निवडक अभंगांची - अर्थाशिवाय सं. भालचंद्र नेमाडे, प्र. साहित्य अकादमी ) घेतली, वाचायला सुरूवात केली आणि बाकीच्या संतांपेक्षा तुकारामाच्य कवितेतलं वेगळेपण लक्षात आलं ( असं प्रत्येकसंतकवीचं काहीतरी वैशिष्ठ्य असेलच ) आणि तुकारामाचा कवी किंवा बंडखोर म्हणून मोठेपणा जाणवायला सुरूवात झाली. अर्थाशिवायची गाथा वाचतोय त्यामुळे त्यातील अभंगाचा अर्थ लावण्यात आणि तो समजण्यात मजा येते.

ज्ञानेश्वरी वाचताना कायम आपण तत्त्वज्ञान वाचत आहोत हे जाणवत राहतं. तुकाराम वाचताना सोप्या भाषेमुळे (काळाचा फरक?), त्यातील प्रामाणिक अनुभवकथनामुळे अभंगातील तत्वज्ञानाचं ओझं जाणवत नाही. त्यामुळे तुकारामाचे अभंग समजायला सोपे व अर्थवाही झाले आहेत. वाचताना लक्षात येतंय की मराठीतील अनेक म्हणी, अनेक वाक्यप्रचार, अभंगातल्या स्फुट ओव्या ज्या सुविचार म्हणून वापरल्या जातात हे सर्व तुकारामाची मराठी भाषेला अतिशय मोलाची देणगी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर - बोलाचीच कढी बोलाचाच भात, गाजराची पुंगी (पूर्ण म्हण नाही तर फक्त concept), कानडीने केला मराठी भ्रतार, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, इत्यादी. मला वाटतं (की कुठं वाचलेलं आहे कुणास ठाऊक) - "सत्य असत्यासी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता|| " हा तुकारामाच्या कवितेचा पर्यायाने अनुभवांचा पाया आहे आणि त्यातूनच तुकारामाची बंडखोरी प्रवृत्ती दिसून येते.

तुकारामाच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्या कवितेतून आपल्याला तुकारामाचा अध्यात्मिक (धार्मिक नाही) प्रवास दिसतो. सुरूवातीला संसाराच्या ओझ्याने वाकलेला व यातून मला सोडव अशी विनवणी करणारा, या दु:खामुळे विरक्ती आलेला, विरक्तीतून भक्तीकडे वाटचाल करत असलेला आणि भक्तीतून आत्मज्ञानाकडे पोचलेला तुकाराम आपल्याला दिसतो. त्यामुळे त्याचं लोकोत्तरपण तर दिसतंच पण तो प्रवास सामान्यत्वातून असामान्यत्वाकडे होणारा असल्यामुळे जास्त सुंदर वाटतो. त्यामुळे सुरुवातीला बायकापोरे शिव्या देतात, देणेकरी दारात ठाण मांडून बसले आहेत अशी वर्णनं करणारा तुकाराम "आपुले मरण पाहिले म्या डोळा", "याचसाठी केला होता अट्टहास" किंवा "तुका आकाशाएवढा" अशा रचना करतो त्यावेळेस त्या प्रवासाने मी आश्चर्यचकित होतो. व हे आश्चर्य मला त्या प्रवासाबद्दल आणखी विचार करायला भाग पाडतं.

हे वाचताना जाणवलेली अजून एक गोष्ट - आपल्याकडील संताना देवपण देण्याची वृत्ती व चमत्कार व दंतकथांमधेच रमून जायची वृत्ती. तुकाराम हा समाजसुधारक आहे याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे व तुकारामाला फक्त एका भक्ताचं रूप देणे. जो तुकाराम भक्तीचे एवढे सुंदर अभंग लिहीतो तोच तुकाराम "माझे लेखी देव मेला | असो त्याला असेल|| " किंवा "आहे ऐसा देव वदवावी वाणी| नाही ऐसे मनी अनुभवावा||" हे लिहीतो हे आपण सोयीस्करपणे विसरुन जातो. तुकारामाचे अभंग इंद्रायणीतून वर येतात ही घटना किंवा तुकाराम सदेह वैकुंठाला जातो ही घटना मला एकतर रुपक वाटतात किंवा थोतांड वाटतात. पण जरा आजूबाजूला पाहिलं तर याच घटनेला जास्त महत्त्व दिलं जातंय असं दिसतं.

मागील काही articles मधे पण मला न झेपणार्‍या गोष्टींबद्दल मी लिहीतोय याची मला जाणीव आहे पण एखादी गोष्ट वाचल्यानंतर/ अनुभवल्यानंतर त्याबद्दलचे विचार मी लिहीत आलेलो आहे. वास्तविक तुकाराम ही काय माझ्यासारख्या माणसाने लिहायची गोष्ट आहे? जिथे म वा धोंड, नेमाडे, चित्रे यासारख्या लोकांनी लिहून ठेवलंय तिथे मी त्याबद्दल लिहीणं म्हणजे खरंतर न झेपणारी गोष्ट आहे. कदाचित इथून पुढेही अशाच एखाद्या /अनेक अशा गोष्टींवर लिहील. त्यावेळेस पुनुरुक्ती नको म्हणून हा परिछेद लिहीला.