कवितेचा अर्थ लागणं ही एक शब्दांत सांगायला अवघड अशी प्रक्रिया आहे. त्यामुळेच एका व्यक्तीला लागलेला एखाद्या कवितेचा अर्थे दुसऱ्या व्यक्तीला जसाच्या तसा समजावून देणं नुसतं अवघड नाही तर काही कवितांच्या बाबतीत अशक्य आहे. जो अर्थ मला कळालाय असं वाटतं पण शब्दांत मांडता येत नाही तो दुसऱ्याला कसा काय समजावून सांगणार? तरीही कविता समजण्यासाठी रसग्रहण हा एक चांगला मार्ग आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ सांगणं नाही तर कवितेची सौंदर्यस्थळं दाखवून देणं. रसग्रहणाबद्द्ल पुन्हा केव्हातरी.
कवी अनिलांची कविता "अर्थ" वाचण्यात आली, जी वाचल्यावर वाटलं की मला कवितेचा अर्थ लागण्याची प्रक्रिया या कवितेतील प्रक्रियेशी बरीच मिळतीजुळती आहे. कविता भावली तर त्यातील शब्द बाजूला पडून त्या कवितेतील भावनांचा परिणाम राहतो. त्यामुळे एखाद्या कवितेपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया निरनिराळे विचार करत पुन्हा एकदा त्या कवितेपाशी येते आणि कवितेतील एखादी प्रतिमा किंवा कल्पना समजली नसेल तरी कवितेचा पूर्ण अर्थ लागल्याचा अनुभव येतो. अनिलांची कविता -
अर्थ
कुणाच्या कवितेत असलेल्या शब्दव्यूहांत
अर्थ शोधीत बसत नाही
वाहावल्या त्याच्या भावप्रवाहात वाहत जातो
बुडी घेऊन पाहतो ठाव कुठे लागतो
चाचपडत बुद्धीचे हात
तळचा गाळ उपसतात
त्यांना काही मिळत नाही
अटकतात चरण मात्र अंत:करणाचे असावधान
जीवनवेलीच्या तंतूने गुंफिल्या
बारीक मुळ्यांच्या कोवळ्य़ा गुंतागुंतीत
सुटतां सुटत नाहीत पाय फसत जातात
आत-बाहेर भिजून होऊन ओलाचिंब पुन्हा येता थडीवर
काही जरी सापडले नाही तरी
सार्थक होते!
- अनिल
कवी अनिलांची कविता "अर्थ" वाचण्यात आली, जी वाचल्यावर वाटलं की मला कवितेचा अर्थ लागण्याची प्रक्रिया या कवितेतील प्रक्रियेशी बरीच मिळतीजुळती आहे. कविता भावली तर त्यातील शब्द बाजूला पडून त्या कवितेतील भावनांचा परिणाम राहतो. त्यामुळे एखाद्या कवितेपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया निरनिराळे विचार करत पुन्हा एकदा त्या कवितेपाशी येते आणि कवितेतील एखादी प्रतिमा किंवा कल्पना समजली नसेल तरी कवितेचा पूर्ण अर्थ लागल्याचा अनुभव येतो. अनिलांची कविता -
अर्थ
कुणाच्या कवितेत असलेल्या शब्दव्यूहांत
अर्थ शोधीत बसत नाही
वाहावल्या त्याच्या भावप्रवाहात वाहत जातो
बुडी घेऊन पाहतो ठाव कुठे लागतो
चाचपडत बुद्धीचे हात
तळचा गाळ उपसतात
त्यांना काही मिळत नाही
अटकतात चरण मात्र अंत:करणाचे असावधान
जीवनवेलीच्या तंतूने गुंफिल्या
बारीक मुळ्यांच्या कोवळ्य़ा गुंतागुंतीत
सुटतां सुटत नाहीत पाय फसत जातात
आत-बाहेर भिजून होऊन ओलाचिंब पुन्हा येता थडीवर
काही जरी सापडले नाही तरी
सार्थक होते!
- अनिल
1 comment:
Mala hi kavita kalali nahi...
Ani taripan anand zalaay.
Eahade na kalanarya bhashetale lokgeet sampla ki jasa fakt taal aplya manaat rahto... agadi toch anand...
Post a Comment